रत्नागिरी: रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. स्वप्नाली सावंत यांच्या हत्येनंतर आता धक्कादायक खुलासे होवू लागले आहे. पती तथा शिवसेनेचा उपतालुकाप्रमुख असलेल्या सुकांत सावंत याने हत्या करण्यापुर्वी थंड डोक्याने मृतदेह नष्ट करण्याचा ‘प्लॅन’अगोदर आखला होता अशी माहिती पुढे येत आहे. त्यानंतर त्याने हत्या करुन घटनास्थळावरुन राखेसह जळालेला कोबा फोडून तोही नष्ट केला. तर जळालेल्या झाडांच्या फांद्याही गायब केल्या. घटनास्थळी राखेचा कणही राहणार नाही. याची दक्षता सुकांत सावंत याने घेतली असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पोलीसांसमोर मोठे आव्हन उभे राहिले आहे.
स्वप्नाली सावंत हत्याकांडामुळे जिल्ह्यास राज्यात खळबळ उडाली आहे. गणेशोत्सवासाठी सासरी मिर्या येथील मुळ घरी आलेल्या स्वप्नाली सावंत हिची पतीनेच हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. दि. ३० ऑगस्टला स्वप्नाली सावंत मिर्या येथे आल्या होत्या. त्यानंतर दि. १ सप्टेंबर दुपार पर्यंत त्या नैवद्याचे जेवण तयार करत होत्या. मात्र दुपारनंतर त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. तर दि.२ सप्टेंबरला पती सुकांत सावंत याने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार शहर पोलीस स्थानकात दाखल केली होती.
खूनाचा तपास करताना धक्कादायक माहिती पुढे येत आहे. सावंत पती-पत्नींमध्ये यापुर्वी अनेक वेळा वाद झाले होते. दोन वेळा स्वप्नालीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सुकांत सावंतवर दाखल आहे.तर इतर अनेक छोट्या तक्रारींचे गु्न्हे पोलीस स्थानकात दाखल आहेत. त्यामुळे सुकांत सावंत याला न्यायालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या.तर मागील एका गुन्ह्यात सुकांत अनेक महिने कारागृहात होता. तेव्हापासून स्वप्नाली बद्दल सुकांतच्या मनात राग खदखदत होता.
स्वप्नालीची हत्या करुन तीच्या त्रासातून मुक्त होण्याचा कट सुकांतने रचला होता अशीही माहिती पुढे आली आहे. गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना स्वप्नालीचा काट काढल्यानंतर पोलीसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी सुकांतने स्वप्नालीचा मृतदेह नष्ट करण्याचा प्लॅन अगोदरच तयार केला होता अशी माहिती पुढे आली आहे. दि. १ सप्टेंबरला दुपारी स्वप्नालीची हत्या केल्यानंतर रात्री तिचा मृतदहे त्याने ठरविलेल्या प्लॅन नुसार जाळला. त्यांच्या विश्वासातील छोटा भाई, कामगार यांना सोबत घेवून मृतदेहाची जाळलेली राख बाजूला काढून त्यानंतर जळालेला कोबा त्याने फोडून काढला. त्यानंतर आगीच्या झळा बसून जळालेल्या झाडांच्या फांद्या तोडून मृतदेहाचे सर्व अवषेश त्याने समुद्रात टाकून नष्ट केले.मृतदेह जाळलेल्या ठिकाणचा कोबा जळाला होता. तो त्याने फोडून तेथे नव्याने कोबा करुन घटनास्थळी काहीच झाले नसल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला होता. तर घटनास्थळावर राखेच्या एक कणहि शिल्लक राहणार नाही याची दक्षता सुकांत ने घेतली होती. यावरुन त्याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्लन पुर्वीच केल्यावर शिक्कामोर्तोब झाले आहे.स्वप्नाली सावंत यांचा मोबाईलही गायब आहे. तो नेमका कुठे आहे. हे अध्याप सुकांतने पोलीसांना सांगितलेले नाही.तो जी ठिकाणे दाखवत आहे.तेथे मोबाईल शोधूनही सापडलेला नाही. त्यामुळे सुकांतने थंड डोक्याने स्वप्नाली यांची हत्या करुन पुरावे गायब केल्याचे स्पष्ट झाले आहे.









