Monday, May 4, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहरात दररोज एक तास पाणी पुरवठ्याचे नियोजन

रत्नागिरी शहरात दररोज एक तास पाणी पुरवठ्याचे नियोजन

रत्नागिरी:- वाढत्या तापमानामुळे रत्नागिरी शहरात तीव्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगरपालिकेने पाणी कपातीचा एक मोठा निर्णय घेतला आहे. आता शहरात दर सोमवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचे आणि आठवड्याचे इतर सहा दिवस पाणीपुरवठ्याची वेळ कमी करून फक्त एक तास करण्याचे नियोजन सुरू आहे.

रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य शीळ धरणातील पाण्याचा साठा वेगाने कमी होत आहे. सध्या धरणात केवळ ४० ते ४३ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. रत्नागिरीत उन्हाचा कडाका वाढला आहे. तीव्र उष्णतेमुळे शीळ धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे, ज्यामुळे पाण्याची पातळी आणखी घटली आहे. मागील दोन वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे पानवल धरणातून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा होत नाहीये. पानवल ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, सध्या शहराला सव्वा ते दीड तास पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा सर्वांसाठी फक्त एक तास करण्याचा विचारही सुरू आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरीमध्ये १२ हजारांपेक्षा जास्त नळ जोडण्या आहेत आणि दररोज १७ ते १८ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. या वाढत्या टंचाईमुळे नागरिकांनी पाण्याचा अत्यंत जपून आणि मर्यादित वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शहराची पाणी टंचाई दूर करण्यासाठी आणि पानवल धरणातील पाणी पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. धरणामधून येणारी जलवाहिनी टाकण्याचे काम अद्याप प्रलंबित असल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व भार शीळ धरणावर आहे.

हवामान विभागाने यंदा अल निनोच्या संकटामुळे पावसाळा लांबणीवर पडण्याचा आणि एकूण पाऊसमानही कमी राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत पाणी जपून वापरणे आवश्यक झाले आहे. शहरात विविध विकासकामांमुळे रस्त्यांच्या कडेला खोदाई सुरू आहे. या कामांवेळी अनेकदा जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत, ज्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होतो.

रत्नागिरी नगरपालिका पाणी टंचाईच्या प्रश्नावर गांभीर्याने विचार करत आहे. पाणी वाचवण्याचा पहिला टप्पा म्हणून प्रत्येक सोमवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, सध्या शहराला सव्वा ते दीड तास पाणी पुरवठा केला जातो. हा पाणी पुरवठा सर्वांसाठी फक्त एक तास करण्याचा विचारही सुरू आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.