आरक्षणावरून जयगड ग्रामस्थांचे रत्नागिरीच्या तहसीलदारांना निवेदन
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीत सन २००९ ते २०१४ या कालावधीत ‘ना.मा.प्र.स्त्री हे सरपंच पदाचे आरक्षण होते. त्यामुळे आता जर रोटेशन पद्धतीने, सर्वसाधारण” किंवा “ना. मा. प्र.” असे सरपंचपद ठेवले तर ते न्यायोचित होईल. ना.मा.प्र. स्त्री सरपंच पद आरक्षित करण्यात आले, तर आमच्या गावातील संबंधित ग्रामस्थ येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असहकार्य करतील असा इशारा जयगड ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत जयगड ग्रामपंचायतचे माजी सरपंच अनिरुद्ध कमलाकर साळवी, माजी सदस्य प्रमोद प्रभाकर घाटगे, शौकत उमर डांगे, जितेंद्र रोहिदास पारकर, मंगेश कमलाकर साळवी या ग्रामस्थांनी रत्नागिरी तहसीलदारांकडे निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ‘ग्रामपंचायत जयगडचे मागील आरक्षण शासनातर्फे सन २०२० ते २०२५ या कालावधीसाठी सरपंच पदाकरीता “सर्वसाधारण” तर याच कालावधीत २२ एप्रिल २०२५ रोजी आपल्याच अध्यक्षतेखाली सरपंच पद ना.मा.प्र. स्त्री म्हणून सन २०२५ ते २०३० साठी आरक्षित दाखविण्यात आले. आता पुन्हा आपण संपूर्ण तालुक्याचे सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करणार आहात. तरी २०२५ अजून संपलेले नाही. २०२५ संपेपपर्यंत ग्रामपंचायत जयगडचे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण असेच ठेवावे. आपल्या या निवडणूक विषयक कार्यक्रमामध्ये जर काही नियमबाह्य / अन्यायकारक इतिवृत्त तयार करण्यात आले तर याविरोधात दाद मागणे हे सन्माननीय उच्च न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये येते आणि हे फार खर्चिक आणि ग्रामपंचायत स्तरावरील कार्यकत्यासाठी कठीण धाणि दुर्धर आहे.”
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, “आपल्याच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण २०२० ते २०२५ हा पंचवार्षिक कालावधी खरोखर पूर्ण होईपर्यंत अबाधित ठेवावे. यदाकदाचित ३१/१२/२०२५ नंतर जयगड ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली तर ती नवीन आरक्षणाप्रमाणे घेण्यात यावी. आपल्याकडील याबाबत नियोजन चुकले तर सर्व साधारण प्रवर्गातील नागरिक/उमेदवार यांचे नुकसान होणार आहे. यापूर्वी सन २००९ ते २०१४ या कालावधीत ग्रामपंचायत जयगडमध्ये ‘ना.मा.प्र.स्त्री हे सरपंच पदाचे आरक्षण होतेच. त्यामुळे आता जर रोटेशन पध्दतीने, सर्वसाधारण” किंवा “नाः माः प्रः “असे ‘सरपंचपद ठेवले तर ते न्यायोचित होईल. ना.मा.प्र.स्त्री सरपंच पद आरक्षित करण्यात आले, तर आमच्या गावातील संबंधित ग्रामस्थ येणाच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालतील, असहकार्य करतील असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.