ऑनलाईन केलेल्या तक्रारीतून प्रौढास ठार मारण्याची धमकी

रत्नागिरी:- ऑनलाईन तक्रार केल्याच्या रागातून प्रौढास रस्त्यात अडवून पुढे जाण्यास मज्जाव करुन कुटुंबासह गाडून टाकू अशी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या चार संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दिपक चव्हाण, राहूल रामचंद्र चव्हाण, रेश्मा रामचंद्र चव्हाण, योगिता रामचंद्र चव्हाण (सर्व रा. साठरेबांबर, भराडीनवाडी, पाली, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास साठरेबांबर भराडीनवाडी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद अनंत कशेळकर (वय ४०, रा. श्रीरामनगर, नाचणे, रत्नागिरी) यांचे साठरेबांबर-पाली येथे आजोळ आहे. त्या ठिकाणी त्यांनी नवीन घर बांधलेले असून त्या घराचे रंगकाम सुरु असल्याने ते पहाण्यासाठी दुचाकी (क्र. एमएच-०८ एएस ७९९९) घेऊन भराडीनवाडी, साठरेबांबर पाली येथे जात असताना संशयितांनी फिर्यादी यांना ३१ मे २०२५ या कालावधीत संशयित राहूल चव्हाण यांच्या विरुद्ध ऑनलाईन केलेल्या तक्रारीचा राग मनात धरुन संशयितांनी रस्ता अडवून पुढे जाण्यास मज्जाव करुन शिवीगाळ व कुटुंबासह गाडून टाकू अशी धमकी दिली. या प्रकरणी प्रसाद कशेळकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.