जिल्ह्यात नव्याने 18 कोरोनाग्रस्त; 22 जण कोरोनामुक्त

रत्नागिरी:- शनिवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 18 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात 24 तासात 22 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 76 हजार 107 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.58 टक्के आहे. नव्याने 18 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 804 इतकी झाली आहे. 

मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 468 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.13 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 111 तर संस्थात्मक विलगीकरणात 114  रुग्ण उपचार घेत आहेत.