वेळवंड मधील ‘त्या’ महिलेचा खून.

मृतदेह जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न

रत्नागिरी:-तालुक्यातील वेळवंड भायजेवाडी सड्यावर ५६ वर्षीय महिलेचा खून झाल्याचे समोर आले आहे. ग्रामीण पोलीस स्थानकात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला जाळून मारण्यात आले की खून करून जाळण्यात आले, याचा तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
वेळवंड येथील महिलेचा पुर्णत: जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. शुक्रवारी सायंकाळी ही घटना समोर आली. रजनी रविंद्र भाजये असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचा मृतदेह पूर्णतः जळाला असल्याने त्यांचा खून करण्यात आला आहे, ग्रामीण पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
रजनी भाजये गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता होत्या. शुक्रवारी सायंकाळी गावच्या सड्यावर त्यांचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. गवताच्या पेंढ्यानमध्ये त्यांचा जळालेला मृतदेह सापडला होता. त्यांचा खून करण्यात आल्याचे समोर आले असून त्यांना जाळून मारण्यात आले की मारून जाळण्यात आले याचा तपास सुरू आहे.