रत्नागिरी:- कोकण रेल्वे मार्ग धावणार्या नेत्रावती तसेच गरीबरथ एक्सप्रेस या दोन गाड्या विद्युत इंजिनसह चालविल्या जाणार आहेत. यातील नेत्रावती एक्सप्रेस २० सप्टेंबरपासून गरीबरथ एक्सप्रेस २२ सप्टेंबरपासून विजेवर चालवली जाणार आहेत. याला कोकण रेल्वे प्रशासनाने दुजोरा दिला.
कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरणाचे काम सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेले असल्याने आता टप्प्याटप्प्याने यामार्गे धावणार्या रेल्वे गाड्या डिझेल ऐवजी विद्युत इंजिनिअर चालविल्या जाणार आहेत. दरम्यान विद्युतीकरण पुर्ण झाल्यानंतर गेल्या वर्षापासूनच कोकण रेल्वे मार्गे धावणार्या मालगाड्या विद्युत इंजिनवर चालवल्या जात आहेत. आता प्रवासी रेल्वे गाड्याही टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस २० सप्टेंबर पासून विद्युत इंजिन सहा चालवली जाणार आहे तर लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम या मार्गावर धावताना २२ सप्टेंबर पासून नेत्रावती एक्सप्रेस लाम डिझेल ऐवजी विद्युत इंजिन वर चालवले जाईल. याच बरोबर कोचुवेली ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणार्या गरिब रथ एक्सप्रेस ला २२ सप्टेंबर पासून विद्युत इंजिन जोडले जाणार आहे. परतीचा प्रवास 23 सप्टेंबर पासून सुरू होइल. गरिब रथ एक्स्प्रेस डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिन वर धावणार आहे.