खासदार सुनील तटकरे यांची गुहागरात माहिती
गुहागर:- सागरमाला, भारतमाला यामधून गुहागरसाठी काही करता येईल का, यासाठी आपण प्रयत्न करीत असून पर्यटन वाढीसाठी विशेष कामे प्रस्तावित करणार आहोत. यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याजवळ दोन बैठका झाल्या असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
खासदार सुनील तटकरे यांनी गुहागर शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेतली. यावेळी गुहागर नगर पंचायतीच्या प्रस्तावित नळपाणी पुरवठा योजनेबाबत विशेष लक्ष देत सदर योजनेला तांत्रिक मान्यता अजून का मिळाली नाही. याबाबत संबंधित ठेकेदाराजवळ फोनवरून संपर्क करून येत्या आठ दिवसांत तांत्रिक मंजूर द्यावी, अशी समज दिली.
तालुक्यातील टांचाईग्रस्त गावांची माहिती घेताना केवळ दोन गावांची मागणी येऊ शकते. यावर गटविकास अधिकारी यांनी गावे नाहीत तर वाड्यांना प्रत्यक्ष भेट द्यावी व टंचाईग्रस्त गावांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पत्रकारांजवळ बोलताना गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील अडीच किलोमिटर अंतरावरील भूसंपदानाची माहीती घेत सदर भूसंपादीत जागांना सांगलीच्या धर्तीवर मोबदला मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तशा प्रकारे मोबदला मिळाला तर येथील शेतकर्यांना जमिनीला चांगला दर मिळेल. तसेच कोस्टल हायवेच्या करंजा, रेवस, आगरदंडा ते तुरंबाड, बागमांडला ते बाणकोटे, जयगड, केळशी याठिकाणातील नऊ पुलांच्या निविदा काढून त्यांच्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत.
यामुळे तीन टप्यामध्ये या महामार्गाचे काम होत असल्याची माहिती कोस्टल महामार्गाच्या आखणीमध्ये बदल करण्यात आला आहे. हा महामार्ग सागरी पट्टयातूनच जावा, असा आपला आग्रह आहे. परंतु काही शहरे मध्ये येत असल्याने शहराला वगळून नवीन आखणी केल्याचे समजते. पर्यटनाच्या दृष्टीने हा मार्ग शहरातूनच जावा, असा आपला आग्रह राहील. बाहेरून रस्ता गेला तर शहराचे महत्वही कमी होईल. शहरातून गेला तर घरे व जागांचे भूसंपादन करावे लागेल. यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे लागेल. रस्त्याच्या कामांचेपण टप्पे करावेत.
रायगडपासूनच रस्ता सुरू होतो. करंजा, रेवस, रत्नागिरी असा तीन टप्यामध्ये याचे काम सुरू व्हावे. यासाठी अर्थसंकल्पातून अधिकचा निधीसाठी प्रयत्न करणार आहे. आपल्याला गेल व आरजीपीपीएलवर जास्त लक्ष केूंद्रीत करायचे आहे. नॅचरल गॅस कमिटीचा मी अध्यक्ष असून स्टँडींग कमिटीची लवकच बैठक बोलवणार आहे. सागरमाला, भारत माला या योजनेतर्गत आपण गुहागरसाठी नेमके काय करू शकतो, बजेटमधील प्रोव्हीजन नुसार काही प्रस्ताव देऊ शकतो का, ते पहाणार आहे, असेही ते म्हणाले.