सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्या तीनशेच्या आत; सहाजणांचा मृत्यू

रत्नागिरी:-जिल्ह्यात मागील 24 तासात 231 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर यापूर्वीचे तीन आणि आताचे तीन अशा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

नव्याने 231 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 67 हजार 247 रुग्ण सापडले आहेत. याच कालावधीत 3 हजार 841 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 4 लाख 47 हजार 604 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

24 तासात 509 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 61 हजार 948 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 92.12 टक्के आहे. 24 तासात 6 मृत्यू झाले असून मृत्यूचे प्रमाण 2. 86 टक्के आहे.