शांतीनगर परिसरात जप्त केलेला अंमली पदार्थ गांजा नसून ड्रग्ज

रत्नागिरी:- शहरानजिकच्या शांतीनगर परिसरात जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ गांजा नसून ड्रग्ज असल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. ॲम्बटामाईन आणि मिथाॅकाेलीन असे दाेन प्रकारचे हे ड्रग्ज असून, ते एकत्र केल्यानंतर काेकीन तयार हाेते, अशी माहिती समाेर आली आहे. हा पदार्थ मुंबईतून आणून रत्नागिरीत विकला जात असल्याचीही माहिती पुढे आले आहे. या प्रकारामुळे रत्नागिरी शहरातही ड्रग्जची विक्री माेठ्या प्रमाणात हाेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

रत्नागिरी शहरानजीकच्या शांतीनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेरील रस्त्यावर गुरूवार१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली हाेती. गांजाची विक्री हाेणार असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी सापळा रचला हाेता. या सापळ्यात एका रिक्षामध्ये पाेलिसांना आठ प्लास्टिकच्या पुरचुंडीमध्ये ५५ हजारांचे अमली पदार्थ आढळले हाेते. त्यावेळी पोलिसांनी प्रवीण परब आणि ओमकार बोरकर या दाेघांना अटक केली होती, तर रिक्षाही जप्त केली आहे.

दोघांकडे चौकशी केल्यानंतर १९ वर्षीय युवती अमली पदार्थाचा पुरवठा करत असल्याचे समाेर आले हाेते. त्यानंतर पाेलिसांनी प्रेरणा साठे (१९, रा. मूळ रा. कारवांचीवाडी, सध्या रा. माळनाका, रत्नागिरी) व मतीन डोंगरकर (३५, मूळ रा. कोकणनगर, सध्या माळनाका) या दाेघांना अटक केली. याप्रकरणी पाेलिसांनी आतापर्यंत चाैघांना अटक केली आहे. पाेलिसांनी अटक केलेली प्रेरणा साठे ही मतीन डोंगरकर याच्या सोबत माळनाका येथे एका इमारतीत भाड्याचा फ्लॅट घेऊन राहत होती. तिथेच अमली पदार्थ आणून त्याचा पुरवठा शहरातील अन्य तरुणांना करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, या अमली पदार्थाची तपासणी केली असता ताे गांजा नसल्याचे समाेर आले आहे. हे ड्रग्ज असल्याचे पाेलिस तपासात उघड झाले आहे. ॲम्बटामाईन व मिथाॅकाेलीन असे दाेन प्रकारचे ड्रग्ज असून, ते एकत्र केल्यानंतर काेकीन तयार हाेते, असे पुढे आले आहे. हे ड्रग्ज मुंबईतून काेठून आणला जात आहे, याचा शाेध पाेलिस घेत आहेत. मतीन डाेंगरकर हा अनेक वर्षे हा व्यवसाय करत असून, प्रेरणा साठे काही महिन्यांपूर्वीच त्याच्यासाेबत काम करत हाेती. याप्रकरणात अटक केलेले प्रवीण परब आणि ओमकार बाेरकर यांना न्यायालयीन काेठडी सुनावण्यात आली आहे. तर प्रेरणा साठे व मतीन डाेंगरकर यांची पाेलिस काेठडीची मुदत २१ राेजी संपणार आहे.