लाडूमधून दिले रिक्षाचालकांना गुंगीचे औषध; बेशुद्ध झाल्यानंतर तिघे प्रवासी ऐवज घेऊन झाले फरार

रत्नागिरी:- रत्नागिरीत शनिवारी दोन रिक्षा चालकांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून त्यांच्याकडील सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, एटीएम, एक तोळ्याची सोन्याची चेन असा माल लुटून अज्ञातांनी चोरून नेले होते. बेशुद्ध असलेले दोन्ही रिक्षा चालक शुध्दीवर आले असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत गुंगीचे औषध लाडू मधूनच देण्यात आल्याचे त्यांनी म्हंटले आहे. आशिष संजय किडये (29, ऱा धनजीनाका रत्नागिरी) व विनेश मधुकर चौगुले (45, ऱा कसोप रत्नागिरी) अशी दोघा रिक्षाचालकांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे की शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास पर्यटक बनून आलेल्या तिघांनी आपल्याला गणपतीपुळे येथे जायचे असल्याचे सांगत आशिष 

किडये याला सांगितल़े. त्यानुसार आशिषने 3 पर्यटकांना गणपतीपुळे या ठिकाणी नेल़े. संबंधित पर्यटक हे रत्नागिरीच्या दिशेने परत येत असताना त्यांनी आशिषला प्रसाद म्हणून खाण्यास लाडू दिला होत़ा. लाडू खाल्ल्यानंतर आशिष हा बेशुद्ध पडल़ा यानंतर तिघांनी त्याच्या हातातील 2 सोन्याच्या अंगठ्या, मोबाईल, एटीएम, एक तोळ्याची सोन्याची चेन लुटून नेली. दरम्यान आशिष हा दुपारी घरी परत आला नसल्याने त्याच्या वडिलांनी शोधाशोध सुरू केल़ी यानंतर आशिष हा दुपारी 2 च्या सुमारास परटवणे साई मंदिर या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याचे दिसल़े त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल़े.

तर दुसऱ्या घटनेत रिक्षाचालक विनेश मधुकर चौगुले यांना दुपारी 2 च्या सुमारास गणपतीपुळेसाठी भाडे मिळाल़े तसे त्यांनी आपल्या मित्राला आपण गणपतीपुळे या ठिकाणी भाडे घेवून जात असल्याचे सांगितले होत़े. दरम्यान सायंकाळी 5.30 च्या सुमारास विनेश हा चंपक मैदान येथे बेशुद्ध अवस्थेत आढळल़ा. त्याच्याकडीलही सोन्याची चेन, पाकिट, रिक्षाची चावी आदी लुटून नेल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत सिव्हील येथे दाखल करण्यात आले होते. शुध्दीवर येताच त्यांनी आपली तक्रार पोलिस स्थानकात दिली.