रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञात चोराने प्रवाशाची सॅकबॅग लांबवून तब्बल 52 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना गुरुवार 20 जुलै रोजी रात्री 11 ते 12 वा. कालावधीत रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे घडली आहे.
याबाबत फिर्यादीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते गुरुवारी कोचीवली एलटीटी एक्सप्रेसने प्रवास करत होते.प्रवासादरम्यान त्यांनी आपली सॅकबॅग सीटवर ठेवली होती. ती अज्ञात चोराने चोरून नेली. त्या बॅगमध्ये सोनी कंपनीचा 40 हजार रुपयांचा लॅपटॉप, सॅमसंग कंपनीचा 5 हजारांचा टॅब आणि रोख 7 हजार रुपये असा एकूण 52 हजार रुपयांचा मुद्देमाल होता.याप्रकरणी अज्ञाताविरोधात भादंवी कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.