रत्नागिरी:- जिल्ह्यात वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा, ग्राहकांना न विचारता जबरदस्तीने घरोघरी बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट वीजमीटर आदी समस्यांचा जाब विचारण्यासाठी ठाकरे शिवसेनेने येथील महावितरणाच्या विभागीय कार्यालयावर धडक मारली. अधिकार्यांना याचा जाब विचारत महावितरणने कारभारात सुधारणा करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने यावेळी देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील वारंवार विजपुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. रत्नागिरी तालुक्यातील असे अनेक गावे आहेत त्यापैकी खरवते सबसेंटर अंतर्गत असलेल्या गावांमध्ये लाईटच्या अडचणी वारंवार येत असतात. त्याठिकाणी वायरमन सुध्दा उपलब्ध नाहीत. तसेच जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अशीच परिस्थिती असल्यामुळे गावांतील गंजलेले पोल व उच्चदाब लाईनवरील झाडे/साफसफाई पावसाळ्यापूर्वी करणे आवश्यक असतानाही याकडे दुर्लक्ष करण्यात आलेला आहे.
अंडरग्राऊंड केबलचे कामसुध्दा अपूर्ण असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तसेच सध्या प्रत्येक घरोघरी स्मार्ट मिटर बसविण्यात येत आहेत. त्यासंदर्भात पक्षातर्फे स्मार्ट मीटरला विरोध असल्याचे निवेदन देण्यात आलेले आहे. तरीही प्रत्येक गावात स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. ग्राहकांवर जबरदस्तीने बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर तात्काळ बंद करावेत अशीही ताकीद देण्यात आली आहे. तरी रत्नागिरी जिल्ह्यातील वरील सर्व समस्या तात्काळ सोडविण्यात याव्यात. अन्यथा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी ठाकरे शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार बाळ माने, सोबत संजय पुनसकर, जिल्हा समन्वयक रत्नागिरी, शेखर घोसाळे, तालुकाप्रमुख रत्नागिरी, प्रशांत साळुंखे, शहरप्रमुख रत्नागिरी, सौ. सायली पवार, महिला विधानसभा क्षेत्र संघटक रत्नागिरी हळदणकर, विजय देसाई, आदी पदाधिकारी व शिवसैनिकीं उपस्थित होते.