संगमेश्वर:- मुसळधार पावसाने काजळी जगबुडी वाशिष्ठी धोका पातळीवर आलेली आहे. या ठिकाणी ब्रिटिश कालीन पूल असल्याने धोक्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिस या जीर्ण पुलावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत.
बावनदीच्या पात्राबाहेर पाणी गेल्याने सप्तलिंगी, वांद्री, मानसकोंड, तळे कांटे, कोळंबे, परचुरी, आंबेड आदी भागात पुराचे पाणी भातशेतीत भरले आहे. ओझरखोल येथे पर्याला तुंब मारल्याने नदीसह पर्याचे पाणी भातशेतीत घुसल्याने भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास वांद्री येथील घरांना पुराचा धोका संभवतो. येथील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









