पैशाच्या वाटपाच्या वादातून भावाने काढला भावाचा काटा

सात महिन्यांनी खुनाला फुटली वाचा

राजापूर:- सागाच्या झाडांच्या विक्रीतुन मिळालेल्या पैशाच्या वाटपाच्या वादावरून सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा काटा काढल्याची घटना राजापूर तालुक्यातील कणेरी खालची वाडी येथे घडली आहे. सुमारे सात महिन्यापुर्वी घडलेल्या या खूनाच्या घटनेबाबत एक निनावी पत्र व त्यानंतर मुलीने केलेल्या तक्रारीवरून हा खून झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी राजापूर पोलीसांनी प्रविण गोविंद लाखण (४८) रा. कणेरी खालची वाडी याला अटक केली आहे. त्याला राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.

प्रविण गोविं लाखण रा. कणेरी खालचीवाडी याने आपला सख्खा भाऊ दशरथ गोविंद लाखण (४९) यांचा खून केल्याची तक्रार दशरथ यांची मुलगी वेदा विजय कोळेकर रा. हातिवले हीने राजापूर पोलीसांत केली आहे. २१ मे २०२३ रोजी हा प्रकार घडला होता.

या खून प्रकरणात प्रारंभी आलेले एक निनावी पत्र व त्यानंतर मुलीला धीर दिल्यानंतर तिच्या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी शिताफीने या प्रकरणी कारवाई करत संशयीत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याबद्दल कौतुक होत आहे.

यातील मयत दशरथ लाखण, संशयित आरोपी प्रविण लाखण व त्यांची आई असे तिघेजण कणेरी खालचीवाडी गावात एकत्र रहात होते. सामाईक मालकीच्या सागाच्या झाडांची विक्री केल्यानंतर त्यातुन मिळालेले पैसे वाटून घेण्याबाबत या दोघांमध्ये वाद होता. सदरचे पैसे आण सर्वांनी वाटून घेऊया असा मयत दशरथ याचा आग्रह होता. यावरून या दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला होता. याचा राग मनात धरून आरोली प्रविण याने भाऊ दशरथ याला २१ मे २०२३ रोजी दुपारी ३.३० च्या पुर्वी काठीने मारहाण्डा केली. या मारहाणीत त्याच्या तोंडावर, डोक्यावर व डोळयावर गंभीर दुखापत झाली होती. यात दशरथ याचा २४ मे २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता मृत्यु झाला होता. त्यानंतर तातडीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावेही नष्ट करण्यात आले होते. असेही वेदा हीने तक्रारीत नमुद केले आहे.

आपल्या वडीलांचा अचानक अशा प्रकारे मृत्यु झाल्याने मुलगी वेदा हीला संशय येत होता. मात्र अशा प्रकारे काही तक्रार केल्यास तुलाही जीवे मारू अशी धमकी प्रविण याने आपणाला दिली होती असे वेदा हिने तक्रारीत नमुद केले आहे. या घटनेनंतर प्रविण हा एकटाच गावातील घरी रहात होता. तर आई ही दुसरा मुलगा संतोष याच्याकडे मुंबईत रहात आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली.

दरम्यान या खूनाबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे एक निनावी पत्र देखील आले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणी उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केडगे व राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ आणि सहकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली व मयत दशरथ यांची मुलगी वेदा हिला धीर देत वस्तुस्थिती कथन करण्यास सांगितले. त्यानंतर वेदा हीने शुक्रवारी या प्रकरणी राजापूर पोलीसात आपली तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी प्रविण लाखण याच्या विरोधात भा. द. वि. कलम ३०२, २०१ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री १० वाजता कणेरी येथील रहाते घरातुन अटक केली आहे. त्याला शनिवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व सहकाऱ्यांनी ही तातडीने या प्रकरणी कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करत आहेत.: सागाच्या झाडांच्या विक्रीतुन मिळालेल्या पैशाच्या वाटपाच्या वादावरून सख्ख्या भावानेच सख्ख्या भावाचा काटा काढल्याची घटना राजापूर तालुक्यातील कणेरी खालची वाडी येथे घडली आहे. सुमारे सात महिन्यापुर्वी घडलेल्या या खूनाच्या घटनेबाबत एक निनावी पत्र व त्यानंतर मुलीने केलेल्या तक्रारीवरून हा खून झाल्याचे पुढे आले असून या प्रकरणी राजापूर पोलीसांनी प्रविण गोविंद लाखण (४८) रा. कणेरी खालची वाडी याला अटक केली आहे. त्याला राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे.

प्रविण गोविं लाखण रा. कणेरी खालचीवाडी याने आपला सख्खा भाऊ दशरथ गोविंद लाखण (४९) यांचा खून केल्याची तक्रार दशरथ यांची मुलगी वेदा विजय कोळेकर रा. हातिवले हीने राजापूर पोलीसांत केली आहे. २१ मे २०२३ रोजी हा प्रकार घडला होता.

या खून प्रकरणात प्रारंभी आलेले एक निनावी पत्र व त्यानंतर मुलीला धीर दिल्यानंतर तिच्या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी शिताफीने या प्रकरणी कारवाई करत संशयीत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केल्याबद्दल कौतुक होत आहे.

यातील मयत दशरथ लाखण, संयशीत आरोपी प्रविण लाखण व त्यांची आई असे तिघेजण कणेरी खालचीवाडी गावात एकत्र रहात होते. सामाईक मालकीच्या सागाच्या झाडांची विक्री केल्यानंतर त्यातुन मिळालेले पैसे वाटून घेण्याबाबत या दोघांमध्ये वाद होता. सदरचे पैसे आण सर्वांनी वाटून घेऊया असा मयत दशरथ याचा आग्रह होता. यावरून या दोन भावांमध्ये वाद निर्माण झाला होता. याचा राग मनात धरून आरोली प्रविण याने भाऊ दशरथ याला २१ मे २०२३ रोजी दुपारी ३.३० च्या पुर्वी काठीने मारहाण्डा केली. या मारहाणीत त्याच्या तोंडावर, डोक्यावर व डोळयावर गंभीर दुखापत झाली होती. यात दशरथ याचा २४ मे २०२३ रोजी दुपारी १.३० वाजता मृत्यु झाला होता. त्यानंतर तातडीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावेही नष्ट करण्यात आले होते. असेही वेदा हीने तक्रारीत नमुद केले आहे.

आपल्या वडीलांचा अचानक अशा प्रकारे मृत्यु झाल्याने मुलगी वेदा हीला संशय येत होता. मात्र अशा प्रकारे काही तक्रार केल्यास तुलाही जीवे मारू अशी धमकी प्रविण याने आपणाला दिली होती असे वेदा हिने तक्रारीत नमुद केले आहे. या घटनेनंतर प्रविण हा एकटाच गावातील घरी रहात होता. तर आई ही दुसरा मुलगा संतोष याच्याकडे मुंबईत रहात आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली.

दरम्यान या खूनाबाबत जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे एक निनावी पत्र देखील आले होते. जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणी उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार केडगे व राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ आणि सहकारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली व मयत दशरथ यांची मुलगी वेदा हिला धीर देत वस्तुस्थिती कथन करण्यास सांगितले. त्यानंतर वेदा हीने शुक्रवारी या प्रकरणी राजापूर पोलीसात आपली तक्रार दाखल केली आहे.

या तक्रारीवरून राजापूर पोलीसांनी प्रविण लाखण याच्या विरोधात भा. द. वि. कलम ३०२, २०१ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून शुक्रवारी रात्री १० वाजता कणेरी येथील रहाते घरातुन अटक केली आहे. त्याला शनिवारी राजापूर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ व सहकाऱ्यांनी ही तातडीने या प्रकरणी कारवाई केली आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ करत आहेत.