राजापूर:- गणेशोत्सवात आणि दिवाळी मध्ये लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले दागिने असे दोनवेळा तब्बल २ लाख ८० हजाराचे दागिने नोकराने लांबवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर यशवंत दळवी (वय २५ वर्षे रा. प्रिंदावण ता. राजापुर) असे त्या गुन्हा दाखल झालेल्या नोकराचे नाव आहे. याबाबत संजय लक्ष्मीकांत काणेकर (वय ५० वर्षे, रा.उन्हाळे (हातिवले) आगरेवाडी ता. राजापुर) यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार काणेकर यांच्या मालकीचे हॉटेल अंकिता पॅलेस मध्ये दिवाळी निमित्त लक्ष्मीपुजन असल्यामुळे त्यांच्या पत्नीचे दागिने पुजनाकरिता पुजनास ठेवले होते. त्यामध्ये गळ्यातील सोन्याचा हार हातातील सोन्याच्या तोडाचा जोड तसेच हातातील सोन्याच्या बांगडाचा जोड व सोन्याचे ब्रोसलेट व मुलांचे इतर दागिने पुजनास हॉटेलच्या ऑफिसमध्ये ठेवले होते. त्या रात्री दागिने ऑफिसमध्येच ठेवण्यात आलेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वा. दागिन्यांची उत्तर पुजा करुन सर्व दागिने डब्यात भरुन पुन्हा कपाटात ठेवण्यात आले होते.
त्यानंतर कपाटात ठेवलेला दागिन्यांचा डबा उघडुन पाहिला असता त्यामध्ये दोन सोन्याच्या बांगडया दिसल्या नाहीत. हॉटेलमधील कामगारांना दागिन्याबाबत विचारले असता ते सर्वजण दागिन्याबाबत काही माहित नाही असे म्हणाले म्हणून रेस्टॉरंट मधील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता हॉटेलमधील कामगार सागर यशवंत दळवी हा २४ ऑक्टोबर रोजी रात्रौ २ वा. रेस्टॉरंट मधील स्क्रू ड्रायव्हर घेवून पाठीमागे लपवत असलेलादिसला म्हणून त्यास तु सोन्याच्या बांगडा चोरल्या आहेस काय असे विचारले असता तोगोंधळुन नाही नाही म्हणाला .२९ ऑगस्ट गणपती उत्सवाच्या वेळी हॉटेल मधील गणेश पुजनाच्या वेळी पत्नीचे सोन्याचे दोन तोडे तीनेबेडरुममधीलड्रेसींग टेबल मध्ये ठेवलेले ते चोरीस गेले ते पण तुच घेतलेस की नाही बोल असे विचारले असता त्याने गणपतीत सदरचे दोन सोन्याचे तोडे आपण चोरल्याचे कबुल केले व त्यास सोन्याचे तोडे कोठे आहेत असे विचारले असता त्याने रत्नागिरी येथील एका व्यक्तीकडे गहाण ठेवल्याचे सांगितले. तर सोन्याच्या बांगड- चोरीबाबत विचारले असता ते सुद्धा त्याने आपणास पैशाची गरज होती म्हणून चोरल्याचे सांगून ते दागिने सुद्धा रत्नागिरी येथील एका व्यक्तीकडे गहाण ठेवल्याचे सांगितले.या प्रकरणी राजापूर पोलिसांनी दळवी याच्या विरोधात भादवी कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधीक तपास राजापूर पोलीस करत आहेत.