Monday, May 25, 2026
spot_img
Home राजापूर तळवडे येथे वणव्यात काजू बाग जळून खाक 

तळवडे येथे वणव्यात काजू बाग जळून खाक 

सुमारे  १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

पाचल:-  सोमवार दि. ६ एप्रिल रोजी भर दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वणव्यात तळवडेतील शेतकरी चित्तरंजन लिंगायत यांची काजूची बाग जळून खाक झाली असून यात त्यांचे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच ते काजू बागेच्या ठिकाणी गेले. परंतु तोपर्यंत बाग पुर्णतः आगीच्या भक्षस्थानी पडली होती. 

        चित्तरंजन लिंगायत यांनी शासकीय योजनेतून ही लागवड केली होती. मागील दोन वर्षापासून या बागेतून त्यांना चांगले उत्पन्नहि मिळत होते.  मात्र, कुटुंबांचे एकमेव साधन असलेली बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने लिंगायत मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. वा-्याच्या जोरामुळे आगीने रौद्ररूप धारण करत त्यांच्या शेजारी असलेली सुर्यकांत उर्फ आब्या लिंगायत यांची देखील ४५० काजू आणि ५० आंबा कलमे असलेली बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून यांचे देखील  ६ ते ७ सात लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मात्र, अजून अधिकृत पंचनामा झाला नसल्याने नेमकी किती नुकसान झाले हे समजू शकले नाही. प्रशासनाने या घटनेचा तत्काळ पंचनामा करून या दोनही नुकसानग्रस्त शेतक-्यांना तातडीने भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.