जिल्ह्यात 24 तासात 6 हजार कोरोना निगेटिव्ह

नव्याने 141 पॉझिटिव्ह रुग्ण तर 15 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 141 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 15 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात 24 तासात 6 हजार 008 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 78 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 72 हजार 154 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 48 टक्के आहे. 

 नव्याने 15 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 15 पैकी 24 तासातील 6 तर त्यापूर्वीचे 9 असे 15 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 299 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.04 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 497 तर संस्थात्मक विलीकरणात 541 रुग्ण उपचार घेत आहेत. 

 मागील 24 तासात 6 हजार 008 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 6 लाख 52 हजार 981 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.