रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 140 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 140 पैकी 81 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 59 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून 609 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
गुरुवारी जिल्ह्यात 140 नव्या रुग्णांची भर पडली. बुधवारी जिल्ह्यात 172 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 12 हजार 020 वर जाऊन पोहचली आहे. गुरुवारी आलेल्या अहवालात 81 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 59 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 609 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आतापर्यंत एकूण 104121 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
चोवीस तासात 59 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 10 हजार 575 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 87.97 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 2 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 388 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.23 % आहे.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 140 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 55, दापोली 34, खेड 11, गुहागर 7, चिपळूण 16, संगमेश्वर 11, मंडणगड 1, राजापूर 2 आणि लांजा तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 10.19% आहे.









