जिल्ह्यात 24 तासात शून्य रुग्णसंख्या 

रत्नागिरी:-गुरूवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 364 तपासण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 5 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

नव्याने 2 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 924 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.99 टक्के आहे. नव्याने एकही पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 465 इतकी स्थिर आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 4 तर संस्थात्मक विलगीकरणात 1 रुग्ण उपचार घेत आहेत.