जाकादेवी खून प्रकरणातील संशयित अद्यापही फरार

रत्नागिरी:- तालुक्यातील जाकादेवी येथे दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीचा खून केल्याचा आरोप असलेला संशयित मागील दोन वर्षापासून फरार झाला आहे. राजेंद्र अडीअप्पा गंटेनेवर (रा. जाकादेवी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २०१९ ला जाकादेवी येथे घडली होती.

राजेंद्र याने पत्नी उज्वला गंटेनेवर (वय ४०, रा. जाकादेवी, रत्नागिरी) हिचा खून केला होता. तिची मुलगी करिष्मा हिने या घटनेची खबर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. उज्वला यांचा मृतदेह मुलीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. उज्वला यांच्या हातावर व डोक्यावर, मानेवर धारदार हत्याराने वार करुन राजेंद्र याने खून केला आरोप ठेवण्यात आला होता. खून केल्यानंतर राजेंद्र घटनास्थळावरुन फरार झाला होता. मात्र काही दिवसात त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र कोरोनाच्या काळात राजेंद्र याला न्यायालयाकडून तात्पुरत्या काळासाठी बाहेर सोडले होते. याचाच फायदा घेऊन राजेंद्रने घेतला व बेपत्ता झाला पोलिसांकडून दोन वर्षापासून शोध घेण्यात येत आहे.