घरात झालेल्या भांडणाच्या रागातून सतरा वर्षीय मुलाची आत्महत्या

रत्नागिरी:- घरात झालेल्या भांडणाच्या रागातून सतरा वर्षीय मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तालुक्यातील गावखडी गुरववाडी येथे रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 

देवानंद संजय गुरव (17, रा. गावखडी, गुरववाडी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी देवानंद याचे वडील संजय गुरव यांनी पूर्णगड पोलीस स्थानकात खबर दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री गुरव यांच्या घरी भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरून देवानंद याने आपले राहते घरातील खोलीचे लाकडी बाराला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. रात्री ही घटना निदर्शनास आली. देवानंद याला उपचारा करीत तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच देवानंद याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकरणी पूर्णगड पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली आहे.