कोरोनाचा कहर सुरुच; जिल्ह्यात 24 तासात 324 कोरोना बाधित रुग्ण

जिल्ह्यात चोवीस तासात तब्बल 7 मृत्यू

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. सलग दुसर्‍या दिवशी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा तिनशेपार पोहोचला आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 324 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 324 पैकी 260 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 64 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढता आकडा चिंताजनक असून बुधवारी जिल्ह्यात 324 नव्या रुग्णांची भर पडली. मंगळवरी जिल्ह्यात 337 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. आता जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 13 हजार 621 वर जाऊन पोहचली आहे. बुधवारी आलेल्या अहवालात 260 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 64 रुग्ण अ‍ॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले आहेत. आज 651 रुग्णांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत जणांचे एकूण 109042 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

गेल्या 24 तासात 66 जण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 299 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 82.95 टक्के आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने 7 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 415 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 3.04 % आहे.

जिल्ह्यातील आज सापडलेल्या 324 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 65, दापोली 82, खेड 35, गुहागर 51, चिपळूण 57, संगमेश्वर 12, मंडणगड 10, राजापूर 9 आणि लांजा तालुक्यात 3 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 11.01% आहे.