रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या झपाट्याने घटत असताना मृत्यूसंख्या मात्र जैसे थे असल्याचे चित्र आहे. नव्याने 69 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 12 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 69 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 752 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 106 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 72 हजार 313 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 47 टक्के आहे.
नव्याने 12 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 12 पैकी 24 तासातीच 1 तर यापूर्वीचे 11 मृत्यू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 314 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.05 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 444 तर संस्थात्मक विलीकरणात 580 रुग्ण उपचार घेत आहेत.