कोकणच्या धरणातील पाणीसाठा संपूर्ण राज्यात सर्वाधिक 

रत्नागिरी:- कोकणातील सर्वच जिल्ह्यात सुमारे 106 टक्के पाऊस यंदाच्या हंगमात झाल्याने आणि सर्वच जिल्ह्यात पावसाने सरासीर गाठल्याने यंदा कोकणातील धरणातील जलसाठा अन्य विभगाच्या तुलनेत अव्वल  ठरला असून नंबर वन ठरला आहे.

राज्यासह कोकणात सर्वच भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दिलासा दिला आहे. राज्यात असलेल्या  धरणातील 95 टक्के जलसाठ्यामध्ये कोकणातील धरणांचा साठा हा अव्वल ठरला आहेे.  त्यामुळे कोकणातील बहुतांश प्रकल्पांतून विसर्ग झाला असला तरी सततच्या पावसाने पाणीसाठा कायम राहिला आहे.  कोकण विभागातील जवळपास सर्वच धरणे काठोकाठ भरली असून या वर्षी या धरणांमध्ये आहेत.98.53  टक्के पाणीसाठा झाला आहे.
सध्या सरासरीच्या तुलनेत सुमारे 25 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीच्या पुढे झाला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोकणात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. याच कालावधित कोकणातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झाला होता.
ऑगस्टच्या शेवटी रत्नागिरी जिल्ह्यातील तीन मोठ्या धरणांमधील पाणीसाठा 90 टक्क्यांवर पोहोचला होता तर  एका प्रकल्पातील म्हणजे अर्जुना प्रकल्पातील धरणसाठा 100 टक्के इतका होता. सप्टेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून पुन्हा विविध भागांत पावसाने जोर धरल्याने या कालावधित पाणीसाठ्यात आणखी भर पडली. त्यामुळे अनेक धरणातील पाण्याचा विसर्ग केल्याने नियंत्रणात होता. महत्त्वाच्या प्रकल्पांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग झाला असला, तरी पावसाच्या सातत्याने  पाणीसाठा कायम राहिला आहे. त्यामुळे विभागा अंतर्गत  सध्या सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागामध्ये 98 टक्के इतका आहे. त्याखालोखाल पुणे विभागात 92 टक्के जलसंकलन झाले आहे. कोकणातील सर्वच जिल्ह्यात  पावसाने आतापर्यंत 25 टक्के अतिरक्त दान दिले आहे. यामुळे रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांश धरणे काठोकाठ भरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 100 टक्के भरलेल्या धरणांनी पन्नाशी गाठली होती.  परतीच्या पावसानेही  सातत्य राखल्याने  धरणातील सिंचन क्षमतेने बाष्पीभवनाच्या वेगावर आवर घातला. त्यामुळे गतवर्षाच्या तुलनेनेे धरणसाठा समाधानकारक आहे.