काजू उत्पादक शेतकर्‍यांसाठी पंचवार्षिक काजू फळपिक विकास योजनेला मंजुरी

1325 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

रत्नागिरी:- कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांसह प्रमुख उत्पादन असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक शेतकर्‍यांसाठी पंचवार्षिक काजू फळपिक विकास योजनेला मंजुरी देण्यात आली असून 1325 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. योजनेच्या समितीने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी 200 कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.

कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा आणि चंदगड तालुक्यातील काज उत्पादक शेतकर्‍यांसाठी काजू फळपीक विकास योजनेला मान्यता दिली आहे. ही योजना पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत काजू लागवडीसाठी काजुची कलमे तपलब्ध करण्यासाठी रोपवाटिकांचो सुविधा निर्माण करणे, प्रत्येक तालुक्यात काजूची नस्ररी उपलब्धकरणे, काजूची उत्पादकता वाढविणे, काजू बोंडांवरील प्रक्रियेस चालना देणे, काजू उत्पादक शेतकरी आणि काजू प्रकल्पधारकाला अर्थसाहाय्य देणे, लागवडीपासून प्रक्रिया व मार्केटिंगविषयक मार्गदर्शन करणे आणि त्यातून रोजगार निर्मिती करणे आदी विकास उपक्रम यामध्ये राबविण्यात येणार आहे. योजना संपूर्ण कोकण विभागा अंतर्गत येणार्‍या पाच जिल्ह्यांबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उत्पादन तालुके असलेल्या चंदगड, आजरा तालुक्यात  राबविण्यात येणार आहे. या योजनेत. रोपविाका, सिंचनासाठी शेततळ्यांची उपलब्धता, विहीर आणि प्रत्येक तालुक्यात पाच हजार मेट्रीक टन क्षमतेचे गोदाम उभारणीसाठीही निधीची तरतूद करण्यात आली आहे.