रत्नागिरी:- रेल्वे प्रवासादरम्यान तरुणाचे सोन्याचे सुमारे 60 हजार रुपयांचे दागिने लांबवल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चोरीची ही घटना 12 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.30 वा.ओख्खा एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी रेल्वेस्टेशन जवळ घडली होती.
याबाबत मनिष जयसुख गडिया (36, रा.पालघर, मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार,12 ऑक्टोबर रोजी ते ओख्खा एक्सप्रेसने प्रवास करत असताना अज्ञाताने त्यांची बॅग लांबवून त्यातील सोन्याची चेन, सोन्याच्या दोन अंगठ्या आणि सोन्याचा हार असा एकूण 60 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत.