रत्नागिरी:- लांबलेल्या अवकाळी पावसामुळे तयार झालेल्या पिकाच्या भात लोंब्या कापणीनंतर गळण्याचे प्रकार घडत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अद्यापही पावसाचा अंदाज असल्याने शेतीच्या कामांचा उरक करण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला आहे.
यावर्षी शेतीला मान्सूनने चांगली साथ दिली. मात्र, ऑक्टोबरच्या शेवटच्या पंधरवड्यापर्यंत अवकाळी मान्सूनने मुक्काम ठोकला होता. त्यामुळे तयार झालेले भातपीक शेतात साचलेल्या पाण्यामुळे कापणे शक्य नव्हते. आता पावसाने परतीचा प्रवासाचे संकेत दिल्यानंतर कापणीला सुरुवात झाली आहे. मात्र, लोंब्यांच्या वजनामुळे भाताच्या काड्या मोडण्याचे व लोंब्या गळण्याचे प्रकार घडू लागले आहेत.
पावसाळ्यात मान्सूनने शेतकर्यांना दिलासा देणारी हजेरी लावली. मात्र, शेती तयार झाल्यानंतरही मान्सूनचा मुक्काम वाढल्याने अवकाळी पावसात तयार झालेले शेतातील भातपीक काही ठिकाणी आडवे झाले तर काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे कापणीला अडचणी निर्माण झाल्या. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने परतीचा मार्ग धरला. परिणामी, शेतकर्यांनी त्याचा फायदा घेत भात कापणीला जोमाने सुरुवात केली आहे. मात्र, परिपक्व झालेले भातपीक व पावसाने दिलेली चांगली साथ यामुळे शेतात भाताच्या लोंब्या भरघोस आल्या आहेत.
परंतु कापणीनंतर या लोंब्यांच्या वजनाने भाताची काडी मोडू लागली आहे तर
अवकाळी पावसामुळे कापणीस उशीर झाल्याने भाताच्या लोंब्याही गळण्याचे प्रकार घडू लागले आहेत.