रत्नागिरी:- राज्य परिवहन महामंडळा मध्ये नवीन सध्या बी एस ६ बांधणी असलेल्या भाडेतत्त्वावरील बसेस दाखल होत असून पहिल्या टप्प्यात त्यातील एकूण ५० बसेस रत्नागिरी विभागासाठी दाखल होत आहेत. त्यापैकी रत्नागिरीला २०, चिपळूण आगाराला १९ तर खेड आगाराला ११ बसेस प्राप्त होणार आहेत त्यापैकी रत्नागिरी आगाराला मिळणाऱ्या २० बसेसचे लोकार्पण शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सावरकर नाट्यगृह येथे होणार आहे.
या बस रत्नागिरी, खेड, चिपळूण आगारातर्फे लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर कार्यरत राहणार आहेत. नवीन येणाऱ्या सध्या बी एस ६ बसेस मध्ये प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत. ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम, प्रत्येक सीट साठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंग पॉइंट, पुश बॅक पद्धतीची आसने, अद्यावत आग नियंत्रण प्रणाली, एअर सस्पेंशन, पॅनिक बटण सुविधा यांचा समावेश आहे.सध्याच्या साध्या बसच्या भाड्यामध्येच या नवीन सध्या गाड्या तील सुविधा प्रवाशांना मिळणार आहेत.