रुग्णसंख्या वाढतीच; जिल्ह्यात 24 तासात 590 पॉझिटिव्ह रुग्ण

रत्नागिरी:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात 590 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करण्यात येत असली तरी वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरत आहे. 590 नवे रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 39 हजार 51 झाली आहे.

मागील 24 तासात तब्बल 16 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने झालेल्या मृत्यूपैकी सर्वाधिक 12 रत्नागिरी तालुक्यातील तर चिपळूण 2 आणि संगमेश्वर तालुक्यात 2  मृत्यूंची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 306 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 379 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 256, खेड 132, गुहागर 92, दापोली 115, संगमेश्वर 160, लांजा 68, राजापूर 92 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.32% आहे

जिल्ह्यात शुक्रवारी 416, शनिवारी 494, रविवारी 508 तर सोमवारी 395, मंगळवारी 655 तर बुधवारी 610 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. बुधवारी पुन्हा 610, गुरुवारी 389 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. गुरुवारी पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढून 590 वर पोचला आहे. आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 1343 पैकी 379 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1 हजार 985 पैकी 211 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.