भैरीबुवा पावला! जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही रुग्ण नाही

रत्नागिरी:-होळीच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरीकरांना भैरी बुवा पावला आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या आवाक्यात होतीच मात्र, सोमवारी जिल्ह्यातून कोरोना हद्दपार झाला. नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. 

 सोमवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 122 तपासण्यांमध्ये करण्यात आल्या. यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. तर 4 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 10 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 81 हजार 907 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.99 टक्के आहे. नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 451 इतकीच आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 7 तर संस्थात्मक विलगीकरणात 3 रुग्ण उपचार घेत आहेत.