रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार करण्यात आलेल्या 2 हजार 805 कोरोना चाचण्यांमध्ये 62 पॉझिटिव्ह रुग्ण भेटले आहेत. तर 2 हजार 803 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 3 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
जिल्ह्यात 24 तासात 79 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 74 हजार 794 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून 96.03 टक्के आहे. नव्याने 62 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 889 इतकी झाली आहे.
कोरोनाने 24 तासात 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 421 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 405 तर संस्थात्मक विलगीकरणात 269 रुग्ण उपचार घेत आहेत.