जिल्ह्यात 24 तासात 90 जण कोरोना पॉझिटिव्ह; 5 जणांचा मृत्यू

रत्नागिरी:- बुधवारी आलेल्या अहवालानुसार केवळ 90 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 53 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 74 हजार 416 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 96.09 टक्के आहे. नव्याने 90 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 77 हजार 447 इतकी झाली आहे. 

कोरोनाने नव्याने 5 मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यातील 4 मृत्यू 24 तासातील  आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 401 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.10 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 383 तर संस्थात्मक विलीकरणात 247 रुग्ण उपचार घेत आहेत.