रत्नागिरी:- मोसमी पावसाचा परतीच्या प्रवास सुरू असला तरी पुढील चार ते पाच दिवस कोकण किनारपट्टी भागात कमी अधिक स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाची हजेरी सुरु राहिल. 10 ऑक्टोबरपासून हा प्रवास थांबण्याची शक्यात हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील काही दिवस कोकणात हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदा मोसम पावसाचे प्रमाण राज्यात 97 टक्के राहिले आहे तर कोकणात 110 टक्के पाऊश झाला आहे. तसेच परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पुढील काही दिवस या पैकी 9 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे.
राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊसाची तूट झाली आहे. यात सांगली जिल्ह्यात सरासरीच्या फक्त 56 टक्के पावसाची नोंद झाली.
सातार्यात देखील सरासरीच्या 62 टक्के पावसाची नोंद, सोलापुरात 69 टक्के पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाळी हंगमात सरासरी पूर्णकेली नसली तरी परतीच्या पावसाने ही तूट भरुन काढल्याची नोंद हवामान विभागाने नमूद केली
आहे.