अंजणारी पुलावरून एलपीजी टँकर उलटल्याने मुंबई- गोवा महामार्ग पंधरा तासांपासून ठप्प

लांजा:- मुंबई-गोवा महामार्ग 15 तासांपासून ठप्प असून रत्नागिरीतील लांज्याजवळ एलपीजी टॅकर उलटल्यानं वाहतूक बंद करण्यात आली आहे.
कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे. मुंबई-गोवा महामार्ग गेल्या 15 तासांपासून ठप्प आहे.

रत्नागिरीतील लांज्याजवळ अंजणारी पुलावरून एलपीजी टँकर उलटल्यानं वाहतूक बंद ठेवण्यात आलीय. अपघातग्रस्त टँकरमधील गॅस बाहेर सुरक्षित बाहेर काढल्यानंतरच या मार्गावरची वाहतूक पूर्ववत होणार आहे. तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.