रत्नागिरी:- शासन निर्णयानुसार संपूर्ण रत्नागिरी जिल्हयामध्ये शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये 3 ते 18 वयोगटातील सर्व बालकांचे सर्वेक्षण करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 4 मुले शाळाबाह्य आढळून आली. तर जिल्ह्यात स्थलांतरीत होउन आलेल्या 63 मुलांचा समावेश असून त्यांना नजिकच्या शाळांमध्ये दाखल करून घेण्यात आले.
जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थी पटासाठी गेल्या दिड दोन वर्षात शिक्षण विभागाकडून विशेष नियोजन केले जात आहे. मोकळा श्वास, पहिलं पाऊल आमचा रत्नागिरीचा भास्कराचार्य, शिष्यवत्ती. सराव परिक्षा, जाण विज्ञान, अनुभवू विज्ञान, रत्नापारा टलट सच अस शक्षाणक उपक्रम राबविल्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारत आहे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होताना दिसून येत आहे.
कोविड -19 च्या कालावधीत ही इंटरनेट च्या माध्यमातून शिक्षकांनी, विद्यार्थ्यांसाठी अनेक अध्ययनाचे पर्याय उपलब्ध करुन दिलेच आणि ज्या ठिकाणी इंटरनेट सुविधा नव्हती तेथ शिक्षकाना स्वत: जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेने इयत्ता 1 ली ते 8 वी साठी स्वत:च्या स्वाध्याय पुस्तिका कमी कालावधीत सर्वदूर पोहोच केल्या आहेत.
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्हा परिषद शाळांचा पट हा वाढत आहे. शैक्षणिक दर्जा, भौतिक सुविधा व अन्य सोई सवलतीमुळे मुलांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल वाढत आहे. जिल्हा परिषद शाळांचा पट टिकविण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जात आहेत. पहिल पाऊल, शाळा पूर्व तयारी मेळावे, स्वाध्याय उपक्रम, गणवेश, पाठयपुस्तक असे उपक्रम परिणामकारक पणे राबविले जात आहेत. शैक्षणिक गुणवत्ता वाढ, शिष्यवृत्तीचा चांगला निकाल, सेमी इंग्रजी वर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे सुजाण पालकांचा जिल्हा परिषद शाळांमध्ये ओढा वाढत चालला आहे.
या सर्व प्रक्रियेमध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी विशेष लक्ष घातले होते. यावर्षी म्हणजे 2022 चा नवोदय चा निकाल खूप कमी काही सांगून जातो. एकूण 80 विद्यार्थ्यांपैकी 48 विद्यार्थी फक्त जिल्हा परिषद शाळांचेच निवडले गेलेले आहेत. मागील 2020-21 व 2021-22 या शैक्षणिक वर्षातील शाळांच्या पटनोंदणीतही विद्यार्थी संख्या वाढलेली दिसून आली. त्यामध्ये सन 2020-21 मध्ये 71810 पट तर 2021-22 या शैक्षणिक वर्षात 73231 इतकी पटसंख्या नोंदणी झाली आहे.
रत्नागिरी जिल्हयामध्ये 5 जुलै ते 20 जुलै 2022 या कालावधीत ग्रामीण व नागरी भागात मिशन झिरो ड्रॉप आऊट मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली. यापूर्वी शाळाबाहय स्थलांतरीत व अनियमित मुलांचा शोध घेण्यासाठी मार्च 2022 मध्ये विशेष शोध मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु त्यावेळी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. सद्यस्थितीत शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्याने 23 जुन 2022 च्या शासन निर्णयानुसार संपूर्ण रत्नागिरी जिल्हयामध्ये शाळाबाहय, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात दाखल करण्यासाठी मिशन झिरो ड्रॉपआऊट मोहिम यशस्वीपणे राबविण्यात आली.