जिल्हा परिषदेचे 31 गट महिलांसाठी राखीव 

रत्नागिरी:- जिल्हापरिषदेच्या एकुण 62 जागांसाठी आरक्षण प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात 31 गट महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सत्तावीस टक्केप्रमाणे 16 जागा आरक्षीत ठेवण्यात आल्या आहेत.

येथील स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात जिल्हा परिषद गटांची आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, तेजस्विनी पाटील आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आरक्षणाच्या चिठ्ठ्या पुजा पास्टे या मुलीने काढल्या. निवडणुक निर्णय विभागाकडून आलेल्या सुचनेनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामध्ये नागरिकांचा मागास वर्गासाठी 27 टक्के प्रमाणे 16 जागा आरक्षित ठेवण्यात आल्या. त्यातील आठ जागांवर महिलांना संधी मिळाली आहे. काढलेल्या आरक्षणानुसार महिला सर्वसाधारण: केळशी, अलोरे, वाटद, दाभोळ, ताम्हाणे, शुंगारतळी, पालगड, उसगाव, पडवे, कोतवडे, पावस, साडवली, विरांचीवाडी, लोटे, धामणदेवी, वेळणेश्वर, नाचणे, धमापूर तर्फे संगमेश्वर, कोसूंब, तळवडे. सर्वसाधारण ः जालगाव, दयाळ, शिरळ, पेढे, शिरगांव, सावर्डे, खेर्डी, उमरोली, वहाळ, निवळी, कोकरे, असगोली, कुवारबाव, गोळप, कनकाडी, दाभोळे, भांबेड, साठवली, केळवली, कशेळी, जुवाटी. नागरिकांचा मागास प्रवर्ग ः इस्लामपूर, बाणकोट, भरणे, कसबा, करबुडे, झाडगाव, कोंडकारुळ, कातळी तर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ः भिंगळोली, कडवई, खालगाव, हातखंबा, खेडशी, साखरीनाटे, धामपुरतर्फे संगमेश्‍वर, माभळे, टेटवली. अनुसुचित जमाती महिला ः सुकिवली. अनुसूचित जाती महिला ः आसगे. अनुसूचित जाती ः भडगाव, गव्हाणे चा समावेश आहे.

आरक्षण प्रक्रियेनंतर कोकरे गटाचे आरक्षण गतवेळी सर्वसाधारण महिला असतानाही यावेळी पुन्हा महिला काढण्यात आल्याचा आक्षेप संतोष चव्हाण यांनी घेतला होता. उमरोली गटाबाबतही तीच सुचना करण्यात आली. दोन्ही सुचनांची उलट तपासणी जिल्हाधिकारी पाटील यांनी तत्काळ केली. त्यात दोन्ही आक्षेप ग्राह्य असल्याचे निदर्शनास आले. आरक्षणाविषयीच्या हरकती पुढील तिन दिवसांमध्ये जिल्हाधिकार्‍यांकडे द्यावयाच्या आहेत.