जिल्ह्यात 115 नवे पॉझिटिव्ह रुग्ण; तब्बल 29 मृत्यूची नोंद 

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 115 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 29 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 115 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 867 इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 56 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 72 हजार 369 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 39 टक्के आहे. 

 नव्याने 29 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 29 पैकी 24 तासातीच 2 तर यापूर्वीचे 27 मृत्यू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 343 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.09 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 470 तर संस्थात्मक विलीगिकरणात 334 रुग्ण उपचार घेत आहेत.