जिल्ह्यात तब्बल 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- 24 तासात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा विस्फोट झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या सलग दुसर्या दिवशी पाचशेवर गेली आहे.अहवालानुसार जिल्ह्यात 515 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सापडलेल्या 515 पैकी 308 रुग्ण आरटीपीसीआर चाचणी केलेले तर 207 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. आज जिल्ह्यात तब्बल 10 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला नाही.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा स्फोटच झाला. आतापर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. 24 तासात 515 रुग्णांची भर पडली. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 15 हजार 075 वर जाऊन पोहचली आहे. शनिवारी आलेल्या अहवालात 308 रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर 207 रुग्ण अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटिव्ह सापडले
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 10 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 439 इतकी आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.91 % आहे. आज 167 जण उपचारादरम्यान बरे झाले असून आतापर्यंत एकूण 11,655 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रिकव्हरी रेट 77.31 टक्के आहे.
जिल्ह्यातील आज सापडलेल्या 515 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 114, दापोली 16, खेड 80, गुहागर 36, चिपळूण 179, संगमेश्वर 41, मंडणगड 2, राजापूर 27 आणि लांजा तालुक्यात 20 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 10.70% आहे.