24 तासात 51 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू

रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार 1 हजार 679 चाचण्यांमध्ये जिल्ह्यात 51 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 2 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 44 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यत 75 हजार 334 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात  कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.11 टक्के आहे. नव्याने 51 पॉझिटिव्ह रुग्ण स पडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 78 हजार 381 इतकी झाली आहे. 

कोरोनावर उपचार घेत असलेल्या 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.  2 मृत्यू 24 तासातील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 438 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.11 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 301 तर संस्थात्मक विलगीकरणात 271 रुग्ण उपचार घेत आहेत.