अपघाती मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

सतेश घाणेकरांचा मृत्यू; पत्नीची तक्रारी द्बारे मागणी

गुहागर:- रस्त्यावरील केबलमुळे असगोली येथे दुचाकी अपघात मृत्यू झालेल्या सतेश घाणेकर यांची पत्नी वैष्णवी घाणेकर यांनी सदर अपघाताला कारणीभूत असलेला वाहनचालक व केबल उभारणाऱ्या कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गुहागर पोलिस निरीक्षकांकडे केली आहे.

श्रीमती वैष्णवी घाणेकर यांनी पोलिसांना याबाबत निवेदन दिले आहे. असगोली येथील सतेश घाणेकर (वय ३८) हे १८ एप्रिलला सायंकाळी मुलगा श्रीवांश घाणेकर व पांडुरंग घर्वे यांच्यासह गुहागर येथून दुचाकीवरून असगोली येथील आपल्या घरी येत होते. या मार्गावर असगोली मधलीवाडी येथे समोरून एक सहाचाकी ट्रक भरगाव वेगाने गुहागरच्या दिशेने येत होता. असगोली मधलीवाडी येथे ग्रामपंचायत येथे जाणारी महानेट कंपनीची वायफायची केबल वायर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या खांबावर बऱ्याच दिवसांपासून खूप खाली लोंबकळत होती. ही लोंबकळणारी वायर भरधाव येणाऱ्या ट्रकच्या वरच्या बाजूला अडकून ताणल्याने तुटली. मात्र सदर केबल दुचाकीवरून प्रवास करणारे सतेश घाणेकर यांच्या दुचाकीवर आदळली. यामुळे दुचाकीचा भीषण अपघात घडला. यामध्ये जखमी सतेश घामेकर यांचे उपचारादम्यान मृत्यू झाला. ४ वर्षाचा माझा मुलगा श्रीवांश, पांडुरंग घर्वे हे गंभीर जखमी असून अजूनही ते उपचार घेत आहे. या अपघातामुळे कुटुंबाचा आधारच हरपला असून कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे अपघाताला व पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या टॅकचालक व मालक, महानेट कंपनी व ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून न्याय मिळवून देण्याची + विनंती केली आहे.