दिवाळीसाठी कोकण रेल्वेच्या विशेष गाड्या

रत्नागिरी: कोकण रेल्वने दिवाळीसाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मध्य आणि दक्षिण रेल्वेच्या समन्वयाने हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर या कालावधीत या विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनल ते मंगळुरू जंक्शन (०११८५) ही विशेष साप्ताहिक गाडी २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी रात्री १०:१५ वाजता मुंबईहून सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सायंकाळी ५:०५ मिनिटांनी मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. त्याचप्रमाणे मंगळुरू जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनल (०११८६) ही विशेष साप्ताहिक गाडी २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६:४५ वाजता मंगळुरू स्थानकातून सुटणार आहे.

गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी २:२५ वाजता लोकमान्य टिळक स्थानकावर पोहोचणार आहे. दोन्ही मार्गांवरून धावणाऱ्या गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुक्काम येथे थांबेल. मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबतील, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.