थेट गृहमंत्र्यांचा फोन… अन् रत्नागिरी पोलीस भारावले

रत्नागिरी:- कोरोना कालावधीत तीन महिने सलग ड्युटी करणाऱ्या रत्नागिरी पोलिसांना बुधवारी सुखद धक्का मिळाला. कोरोनाशी एखाद्या योध्याप्रमाणे लढणाऱ्या पोलिसांना थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन करून शाबासकीची थाप दिली. बुधवारी रत्नागिरी पोलीस दलातील काही पोलिसांना हा कॉल आला होता, ‘तुम्ही कसे आहात, तुमचे सर्वांचे कौतुक आणि स्वत:ची काळजी घ्या,’ असा संदेश या फोनद्वारे देण्यात आला. या फोनमुळे अनेकांना कोरोना सोबत लढायला बळ मिळालं.

लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून महाराष्ट्रासह रत्नागिरीतील पोलीस ऑन ड्युटी चोवीस तास हजर आहेत. रस्त्यावरची गर्दी कमी करणे, विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर अंकुश ठेवणे, कोरोनाग्रस्त रुग्णांना प्रसंगी रुग्णालयात दाखल करणे, उपचारापूर्वी पळून गेलेल्या रुग्णांचा शोध घेणे, नाकाबंदी, वाहन तपासणी, विना परवाना येणारे लोंढे रोखणे अशी एक ना अनेक कामे पोलिसांच्या खांद्यावर पडली. पण ही कामे जबाबदारी समजून पोलिसांनी पार पाडली. पगार उशिरा झाले म्हणून कुरबुर न करता पोलिसांनी दिवस रात्र एक करून कोरोनाचा सामना केला. 

 दोन महिने उलटून गेले तरी कोरोनाची संख्या कमी होत नसल्याने हळूहळू जनजीवन पूर्ववत करण्यासाठी शासनाने थोडी शिथिलता आणली त्यामुळे पोलीसांवरही थोडी मर्यादा सध्याच्या काळात आली आहे. मात्र 17 मार्चपासुन अगदी 22 मे पर्यंत पोलीसांनी केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.

अजूनही कंन्टेमेंट झोन असेल व इतर भागात पोलीस 24 तास ड्युटी करत आहेत, त्यामुळे गृहमंत्र्यांनी फोनव्दारे पोलीसांशी संवाद साधण्याचा पयत्न सुरू केला आहे. मुंबई पोलीसांना तर गृहमंत्री थेट भेटून त्यांना मनोबल देत आहेत मात्र इतर जिल्ह्यातील पोलीसांनाही दिलासा देण्यासाठी फोनव्दारे मनोबल वाढण्याचा पयत्न करत आहेत. रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील काही कर्मचाऱयांना बुधवारी कॉल आला, ‘हॅलो मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, कसे आहात, कोरोना काळात तुम्ही सर्वांनी चांगली ड्युटी केली, स्वत:ची काळजी घ्या’ या वाक्याने कर्मचारीही भारावून गेले. सुरूवातीला कर्मचारी अवाप् झाले, गृहमंत्र्यांचा कॉल कसा असेल पण हा कॉल जरी थेट नसला तरी रेकॉडिंग केलेला होता, एकावेळी सर्वांशी बोलणे शक्य नसल्याने गृहमंत्री देशमुख यांनी रेकॉडिंग कॉलव्दारे संवाद साधला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रेकॉडिंग कॉलव्दारे एकाच महाराष्ट्रातील हजारो पोलिसांचे मनोबल वाढविणारा संदेश दिला. असे यापूर्वी कधीच झाले नव्हते भले गृहमंत्र्यांचे संभाषण रेकॉडिंग करून एकाचवेळी कर्मचाऱयांशी संपर्प साधण्यात आला असला तरी हे आमच्यासाठी खरच समाधानकारक बाब आहे, हा अनुभव आमच्यासाठी वेगळा असल्याचे रत्नागिरीतील पोलीस कर्मचाऱयांनी व्यक्त केली आहे.