जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू; बळींची संख्या तीनवर

रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला आज जे  5 जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील एका कोरोना बाधित रुग्णाचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. गुहागर तालुक्यातील जामसुदमधील हा कोरोना पॉझिटिव्ह 65 वर्षीय रुग्ण होता. त्याचा रविवारी मृत्यू झाला होता. आणि आज त्याचा रिपोर्ट आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनामुळे तिसरा बळी गेला आहे. 

दरम्यान जिल्हयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 52 वर पोहचली आहे. यातील 5 जणांना यापूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. तर एकूण तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण 44 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. दररोज 4 ते 5 रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या चिंतेत भर पडली आहे.