सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत नवनिर्मितीने भरले महामार्गावरील खड्डे.

सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत सामाजिक,आरोग्य,कला,
शैक्षणिक,क्रिडा,पर्यावरण आदि.क्षेत्रात कार्यरत असणारे नवनिर्मिती फाऊंडेशन उक्षी आज एल्गार पुकारत राष्ट्रीय महामार्ग पडलेल्या खड्डे पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सुजान नागरीक,स्कूलचे विद्यार्थी, जेष्ठ नागरिक , महीला आदिसह संबंधित विभागाला जाग यावी म्हणून महामार्गावरील खड्डे भरले आहेत.या सामाजिक उपक्रमांचे जनतेतून स्वागत आणि कौतुक होत आहे.

राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून रस्त्यात खड्डे की खड्ड रस्ते असे प्रश्न वाहन चालकांना पडला आहे. महामार्गावर गाडी चालवणे सोडा नीट चालता ही येत नाही.फुट भर पडलेले खड्डे आणि त्या खड्ड्यात कशी गाडी चालवायची असा संतप्त सवाल वाहन चालक विचारत आहे.या पडलेल्या खड्ड्यांचा त्रास फक्त वाहन चालकांना होत नसून सर्व सामान्यांना ही होत आहे.महामार्गावर काचा वरती करून एसीतून फिरणारे मंत्री व अधिकारी वर्गाला हे दिसत नाहीत का? असा सवाल उपस्थित केला आहे.या महामार्गावरील खड्ड्यानी 4 बळी पडले असून अनेकांची हाडे मोडली आहेत.अजून किती दिवस सहन करायचे. गणपतीच्या कोकणातल्या सर्वात मोठ्या उत्सवानिमित्त येणारे चाकर मानींना पण खड्ड्यातून यावे लागले.गणरायांचे विसरजण पण या खड्ड्यातूनच करावे.आता किती दिवस या महामार्गावरील सागरातुन प्रवास करायचा त्यामुळे याचा निषेध म्हणून नवनिर्मिती फाऊंडेशनच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्गावर आंबेड बु. येथे दिड फूट पडलेल्या खड्डे भरून निषेध करणार केला आहे..या कार्यक्रमाला नवनिर्मिती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रमजान गोलंदाज,अमोल पाटणे, अतिश पाटणे,राजेश आंबेकर,सलाउद्दीन बोट,विनायक खातु,रिजवान केळकर,राजेंद्र पोमेंडकर,सलीम सय्यद,दिलावर फकीर, दानिश बोट,मेहराज बोट,संजय आग्रे ,आदिसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.राष्ट्रीय महामार्ग खड्डे मुक्त केला नाही तर आठ दिवसात मोठे आंदोलन उभारू असा इशाराही देण्यात आलाय.