रत्नागिरी:-मुंबई – गोवा महामार्गावरील हातखंबा दर्ग्याजवळ ट्रकने रिक्षाला मागून दिलेल्या धडकेत रिक्षामधील 5 जण जखमी झाले. ही घटना गुरुवारी रात्री 12 वा. च्या सुमारास घडली. अपघातातील पाचही जणांवर रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून अज्ञात ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जैनुल सारंग, शेरबानू सारंग, जसिम सारंग, अफ्रिन सारंग व उमेरा सारंग ( रा . सर्व साखरपा रत्नागिरी ) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी जैनुल यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात ट्रकचालका विरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षा चालक जैनुल हे गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रिक्षा घेवून साखरपा ते रत्नागिरी असे येत होते. दरम्यान हातखंबा दर्ग्याजवळ त्यांची रिक्षा आली असता मागून येणारा ट्रकने जैनुल यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. अपघातात रिक्षामधील ५ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल वाझे करत आहेत.









