शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाचवीचे ८१५८, आठवीचे ४०१० विद्यार्थी हजर 

रत्नागिरी:- पूर्व माध्यमिक पाचवी आणि उच्च माध्यमिक आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षा रविवारी (ता. ३१) शांततेत पार पडल्या आहेत. पाचवीसाठी ८ हजार १५८ विद्यार्थी तर आठवीसाठी ४ हजार १० विद्यार्थी परिक्षेत सहभागी झाले होते. दोन्ही मिळून ५३१ विद्यार्थी अनुपस्थित राहीले आहेत.

शिष्यवृत्ती परिक्षांची तारीख मागीलवेळी बदलण्यात आली होती. जिल्ह्यात विविध केंद्रावर ही परिक्षा घेण्यात आली होती. शिक्षण विभागाकडून प्रत्येक केंद्रावर नियोजन केले होते. शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात नियोजन करण्यात आले होते. परिक्षांसाठी १३९ केंद्र निवडण्यात आली होती. पेपर पहिला सकाळी ११ ते १२.३० तर दुसरा पेपर १.३० ते ३ असा होता. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा केंद्रावर येण्याचा मार्ग मोकळा झाला होता. पाचवीसाठी नोंदणी केलेल्या ४ हजार १९३ पैकी परिक्षा देणार्‍यांमध्ये २ हजार ९९६ मराठी माध्यम, २८५ उर्दु आणि ७२९ इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी होते. आठवीमध्ये नोंदणीकृत ८ हजार ५०६ विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष परिक्षेला बसलेल्यांमध्ये ६ हजार ७२४ मराठी, ४०८ उर्दु आणि ९२६ इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी होते.