रत्नागिरीः– तोक्ते चक्रीवादळ रत्नागिरीच्या दिशेने सरकत असले तरी त्याचा प्रभाव किनारपट्टीवर जाणवू लागला आहे. समुद्र खवळला असून, लाटा किनार्याला धडकत आहेत. वाऱ्याचा वेग वाढला आहे. सायंकाळी 4 च्या दरम्यान चक्रीवादळ रत्नागिरी किनारपट्टीसमोरुन पुढे सरकेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.









