रत्नागिरी:- जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा घट झाली आहे. सोमवारी झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात जवळपास सहाशे तपासण्यांमध्ये केवळ 57 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 131 रुग्ण उपचारांती बरे झाले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात 131 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 80 हजार 320 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95.88 टक्के आहे. नव्याने 57 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 83 हजार 775 इतकी झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत 2 हजार 513 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.1 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 551 तर संस्थात्मक विलगीकरणात 344 रुग्ण उपचार घेत आहेत.