रत्नागिरी रेल्वे स्थानकात रेल्वेतून पडल्याने तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या कोचिवली एक्स्पेसमधून मुंबईला जाणाऱा प्रवासी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे चढत असताना पाय घसरुन पडल. गंभीर जखमी प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुपेश एकनाथ गुरव (वय ४२, रा. होळी-जैतापूर, ता. राजापूर) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १५) सकाळी पावणेनऊच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन पलाट क्र. २ येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रुपेश मुंबईला जाण्यासाठी कोचिवली-इंदोर एक्स्प्रेस मध्ये चढत असताना त्याचा पायघसरुन तो पडला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र गंभीर जखमी रुपेशवर उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.